खरं तर ठरवलं होत


खरं तर ठरवलं होत
एकट जगायचं👤,
ध्येय ठरलेल्या घारीप्रमाणे अवकाशात वावरायचं,
ना कुणाच व्हायचं,
ना कुणाला आपलं बनवायचं,
मिळत जातात वेदना,
भावनांचे आकाश फाटत जाते,
दरी अश्रूंची आणि हास्याची जिथे
विनासायात  वाढत जाते,
असं हे वेदनादायी प्रेम  तरी
कुणावर कुणी कसं करत?
जिथे वेदनांचा बाजार,भावनांचा
कळवळा उगाचच सादर करत,
तरीसुद्धा मन कुणावर प्रेम करायचं थांबत नाही,
वाट अवघड असली तरीसुद्धा
चालायचं ते  थांबत नाही...💕💕


                         

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post